Thursday, October 25, 2007

आमची सिक्कीम सफर भाग 3

सुमारे अडीच महिने आधी तिकिटे काढली होती. तरी सुद्धा आमचे २ बर्थ डब्याच्या या टोकाला आणि २ डब्याच्या त्या टोकाला होते. टीसी ने सांगितले की डब्यात जागा नसल्याने चौघे एकत्र देता येणार नाहीत. शेवटी प्रवाशांना विनंती करून बघायचं ठरवलं. एक जण पलिकडे जायला तयार झाला. पण दुसरा एकटा असूनही मक्खपणे नकार देता झाला. शेवटी अनुपम त्या टोकाला आणि आम्ही तिघे या टोकाला राहिलो. आमचे सहप्रवासी होते सुरभी ही मेडिकलची विद्यार्थिनी. ( ही बिहारची. धुळ्याच्या मेडिकल कॉलेजात दुस-या वर्षाला शिकते. सुटी लागल्याने महिनाभरासाठी जमालपूर या आपल्या गावी निघाली होती.) आसामचा एक माणूस, जो मुंबईला कोणत्या तरी सिक्युरिटी सिस्टीम बनवणा-या कंपनीत मार्केटिंगचं काम करतो. तो त्याच्या कंपनीच्या सेमिनार्ससाठी गुवाहातीला निघाला होता. त्यानेही इंटरनेटवरून गाडीचा रूट डाउनलोड करून आणला होता आणि वारंवार त्यात डोकं घालून गाडी किती लेट चालते आहे हे सर्वांना सांगत होता. ती मुलगी आणि हा आसामी दोघेही या गाडीने ब-याचदा प्रवास केलेले होते आणि ही गाडी सदैव लेट असते, तिला सर्वत्र सायडिंगला टाकून आणखी लेट करतात हे जाणून होते. आणि तरीही पुन्हा याच गाडीने प्रवासाला निघाले होते. आम्ही तर धास्तावलेलेच होतो. कारण गाडी आधीच साडे तीन तास लेट आलेली, त्यात आणखी किती लेट होते कोण जाणे ! गाडीचा पहिलाच स्टॉप होता बुरहानपूर. तिथे उतरणार होते एक दाढीवाले बोहरी आजोबा आणि त्यांची तरूण सून. सूनबाई डॉक्टर - दुबईला असते. आजच विमानाने मुंबईला उतरली आणि या गाडीने सासरी निघाली होती. ती बरीच बोलकी असल्याने आणि सुरभी मेडिकलची विद्यार्थीनी असल्याने त्यांच्या गप्पा ब-याच रंगल्या होत्या. बोहरी कंपनी बुरहानपूरला उतरल्यावर त्याच्या जागा आम्ही घेतल्या. अनुपम त्याच्या जागेवर निघून गेला. गाडी आता चार तास लेट चालत होती. सकाळ होई पर्यन्त ती सहा तास लेट झाली. रात्री १२ वाजता येणारे जबलपूर सकाळी सहाला आले. आम्ही मस्त झोपलो होतो. आम्ही भुसावळला जशी दिवसभर वाट पाहिली, तशी रात्रभर जबलपूरला गाडीची वाट पाहणारे एक बंगाली कुटुम्ब समोरच्या बर्थवर आले आणि आल्या आल्या झोपी गेले. गाडीतल्या बेडिंग रोलमधे मिळालेली उशी अगदीच लेची पेची असल्याने आम्हा सर्वांचीच पंचाईत झाली. पुढे एका स्टेशनवर जुलेखासाठी एक हवेची उशी घ्यावी लागली तेव्हा ती व्यवस्थित झोपू शकली. खाण्यापिण्यासाठी गाडीतल्या व्यवस्थेवर पूर्णपणे विसंबून राहणे चुकीचे ठरते. त्यांची एकच भाजी असते (बटाट्याची) आणि जेवणाची चवही एकच असते. त्यामुळे सोबत भरपूर खाद्यसामुग्री आणायला हवी. जसं की आमच्या डब्यातल्या एका गुजराती परिवाराने केलं होतं. जाम, जेली, बटर, ब्रेड, चटण्या, लोणची, मुरांबे असा भरपूर जामनिमा सोबत घेऊन ते आले होते आणि सतत त्याचा फडशा पाडत होते.एव्हाना आसामी आणि सुरभी शी चांगली मैत्री झाली होती. त्यामुळे आम्ही अंताक्षरी, पत्ते असा टाइमपास करत होतो. सुरभीला भरपूर गाणी येत होती. तिचे वाचन आणि सामान्य ज्ञान बरेच चांगले होते. त्यामुळे कंपनीसाठी चांगली होती. जुलेखाने पत्ते खेळण्याची टूम काढून सर्वांना त्यात सामील करून घेतले. एव्हाना समोरचे बंगाली कुटुम्ब जागे झाले होते. त्यांचा छोटा मुलगा शान फारच गोड आणि बडबड्या होता. त्याची आई सुद्धा आमच्याबरोबर पत्ते खेळू लागली. ते सुद्धा गुवाहातीला जात होते. मधे मुगलसराय स्टेशनवर मिळालेली संत्री आणि आंबे खूपच छान निघाले. त्यामुळे जुलेखा, अनीका, अनुपमचा खूप फायदा झाला. कारण त्यांना गाडीतले जेवण मुळीच आवडत नव्हते. मी आपला आलिया भोगासी असावे सादर म्हणत ते गोड मानून घेत होतो. गाडी आता सात तास लेट चालत होती. एव्हाना तिने मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश मागे टाकून बिहारमधे प्रवेश केला होता. बिहार मधे कुणीच कायदा पाळत नाही, चालत्या गाडीत लुटालूट होते अशा भयानक कहाण्या सांगून आसामी आम्हाला घाबरवत होता.

आमची सिक्कीम सफर - भाग २

गरम कपडे काय घ्यावे यावरही बराच खल झाला. अनुपम नेहमी प्रमाणे सर्वात शेवटी तयारीला लागला आणि चुकीचे कपडे घेऊन त्याची तयारी एकदाची कशीबशी पूर्ण झाली. ११च्या सकाळी महाराष्ट्र एक्स्प्रेसने आम्ही भुसावळला जाण्यासाठी निघालो. चार जण आणि सहा डाग म्हणजे बरेच आटोपशीर सामान होते. एसी मधे उशा गरम पांघरूण मिळते त्यामुळे ते ओझे घेण्याची गरज नव्हती. जेवण सुद्धा चांगले मिळते असे नरेश कडून समजले होते. तरी सुद्धा रात्री साठी जबीन कडे असताना खिचडी बनवून सोबत नेण्याचे ठरले होते. ९ वाजता जबीनच्या गावाला पोचलो. तिच्याकडे कूलर आणि तिची मुलगी असल्यामुळे दुपार कशी गेली ते कळलंच नाही. आमची गाडी (गुवाहाती एक्स्प्रेस) दुपारी ३.३० ला असल्याने अडीच वाजता रणरणत्या उन्हात आम्ही स्टेशनवर पोचलो आणि पहिला धक्का बसला. गाडी साडे तीन तास लेट ! मग आमची वरात पुन्हा जबीनच्या घरी. तिथे पोचलो तर वीज गायब. तास दोन तास घाम गाळत टाइमपास केल्यावर सहा वाजता पुन्हा स्टेशनवर. पण गाडीचा अद्याप पत्ता नाही. सगळ्या गाड्या येताहेत आणि जाताहेत. कर्नाटक गेली, सचखंड गेली. सात वाजून गेले. आम्ही आपले सहा नंबरच्या फलाटावर प्रत्येक घोषणा कानात तेल घालून ऐकतोय. आणि अचानक घोषणा झाली की गुवाहाती सात नंबरपर कुछही पलोंमें आ रही है....! दुसरा धक्का ! आम्ही सामान उचलून सहा नंबरचा जिना चढून सात नंबरवर पळायला लागलो. त्याच वेळी मुंबई पॅसेंजर आलेली. तिची प्रचण्ड गर्दी सात नंबरचा जिना चढू लागली आणि त्याच वेळी गुवाहातीचे आगमन झाले. आम्ही अद्याप जिन्यावरच ! कारण त्या महाभयानक गर्दीतून खाली उतरणे आणि तेही दोन्ही हातात - गळ्यात सामान घेऊन ! शेवटी अक्षरश: रेटारेटी - धक्काबुक्की करून, शिव्याशाप देत आणि घेत आम्ही कसेबसे सात नंबरवर पोचलो. आता एसी थ्री चा डबा कुठे शोधायचा ? कुणी म्हणतो पुढे आहे, कुणी म्हणतो मागे ! असे मागे पुढे पळापळ करत एकदाचे कसेबसे डब्यात घुसलो आणि हुश्श म्हणत जागेवर टेकलो.

Monday, October 22, 2007

आमची सिक्कीम दार्जिलिंग सफर - भाग १

दि. ११ मे शुक्रवार रोजी सिक्कीम दार्जिलिंग यात्रेसाठी आम्ही घराबाहेर पडलो. त्याआधी सुमारे २ महिन्यांपासून तयारी सुरू होती. इंटरनेटवरून, पुस्तके, मासिके, लेख इ. वरून माहिती काढणे; जाउन आलेल्या मंडळींना त्यांचे अनुभव विचारणे, केसरी - प्रसन्न टूर्स इ. कडे चौकशा करणे असं चाललं होतं. पण तरीही समाधानकारक अशी माहिती व मार्गदर्शन कुठूनच मिळत नव्हतं. yatra.com, cleartrip या वेब साइटस वरूनही चौकशी केली होती. सर्वजण वेगवेगळी बजेटसदेत होते. पुण्याला वासंती घैसास या प्रवास विषयक सल्ला व मार्गदर्शन देणा-या लेखिका आहेत. त्यांच्याशी सुद्धा फोनवरून बोललो. त्यांनी मे महिन्यात त्या प्रदेशात पाउस असतो असे सांगितल्याने जरा धाकधुक वाटू लागली. पण ठरलेल्या तारखा सर्व दृष्टीने सोयिस्कर असल्याने त्यात बदल न करता AC III Tier ची जाण्या येण्याची तिकिटे काढून घेतली. आता प्रश्न आला हॉटेलच्या बुकिंगचा. त्यासाठी Rotary ची मदत घ्यायचे ठरवले. Rotary च्या वेबसाइटवरून दार्जिलिंग, सिक्कीम, सिलिगुडी इ. ठिकाणच्या रोटरी क्लबांच्या पदाधिका-यांचे फोन नंबर मिळवून त्यांना sms केले. Rotary Club of Siligudiच्या In coming President रो. डॉ. इकबाल यांचा रिप्लाय आला. त्यांना ई मेल करून विनंती केली. त्यांनी कळवलं की R.C. of Darjiling चा In coming President रो. ताशी हा स्वत:च Hotel Seven Seventeen चा मालक आहे. त्याचा फोन नं त्यांनी दिला. त्याच्याशी फोन वर बोललो. ई मेल करून तारखा कळवल्या आणि एडवान्स म्हणून UTI Bank च्या जळगाव शाखेत ५००० रू. जमा सुद्धा केले. त्यानुसार सावकाशपणे २ दिवस गांतोक (Hotel Chumbi Residency), २ दिवस पेलिंग (Hotel Sonamchen) आणि ३ दिवस दार्जिलिंग (Hotel Seven Seventeen) असे बुकिंग रो. ताशीने करून ई मेल द्वारा कळवले. येताना कोलकाताला २ दिवस थांबायचे असल्याने महाराष्ट्र मंडळात फोन करून बुकिंग करून ठेवले. ५०० रू.ची मनी ओर्डर सुद्धा करून ठेवली. पण कोलकाताला खूप उकाडा असल्यास AC Hotel मधे जाण्याची पण तयारा राहू दिली. अशी सर्व तयारी झाल्याने प्रवासाचे काही फारसे टेन्शन नव्हते. पण तरीही सामान गोळा करणे, काय घ्यावे काय नको याचा शेवटच्या क्षणापर्यन्त गोंधळ, खाण्याचे पदार्थ काय काय घ्यावे याची शेवटच्या क्षणापर्यन्त सुरू असलेली तयारी. अनीकाची बॅग भरणे तर महिनाभर सुरू होते. गंमत म्हणजे माझ्यासाठी पुण्याच्या मॉलमधून जे कपडे खास या ट्रिपसाठी आणले होते त्यातल्या ट्राउजर्स मला खूप घट्ट होते होत्या. त्यामुळे त्या रद्द झाल्या आणि पॅण्ट शर्ट घ्यावे लागले. तरीही बायकोने इथल्या दुकानातून एक खाकी रंगाची कार्गो आणलीच.

Wednesday, October 17, 2007

बचपनकी यादे

चालीसगाव नामका छोटासा शहर है जो महाराष्ट्र के जलगाव जिले में हैं. मैं वहीपर जन्मा, पढा लिखा, बडा हुवा. और आज भी वहींपर रहता हूं. १९५२ में मेरे पिताजी ने, जो कि पेशेसे वकील थे, यहांपर सिनेमा थिएटर शुरू किया. पहली फिल्म लगी थी 'गुळाचा गणपती'. यह फिल्म मराठीके बेजोड लेखक कै. पु.ल.देशपांडे द्वारा बनाई गई थी. लेखन, दिग्दर्शन, संगीत और अभिनय सब कुछ पु.ल. का था. वे मराठी के पी.जी.वुडहाउस माने जाने थे और बेहद लोकप्रिय रहे. आजतक वैसी लोकप्रियता कोई हासिल नही कर सका है. इस फिल्मका एक गीत ग.दि.माडगुळकरजीने लिखा था और पं. भीमसेन जोशी जी ने गाया था जो आजतक कमाल का लोकप्रिय है. शायद आपने भी सुना हो. 'इंद्रायणी काठी, देवाची आळंदी, लागली समाधी, ज्ञानेशाची.' 

मेरा जन्म १९५८ मे हुवा. उसके पहले अनारकली, नागिन आदि हिट फिल्मे हमारेही थिएटरमे प्रदर्शित हुई और रिरन होती गयी. मेरी मा जब उनकी यादे सुनाती थी तब हम बच्चे सुनते रह जाते थे. नागिन के 'मन डोले मेरा तन डोले' गीतमे जब बीन बजती थी तब लोग पागल हो जाते थे और परदेपर पैसे बरसाते थे. किसी मनोरुग्ण दर्शक के शरीरमें नागदेवता पधारते थे और वो नाग-साप की तरह जमीन पर लोटने लगता था. 

हमारा बचपन तो बस फिल्मे देखते देखते ही गुजरा. कोई भी फिल्म कमसे कम ३-४ हप्ते तो चलती ही थी. हमारी थिएटर के अलावा और २ थिएटर्स थी. हमारीवाली देखकर बोअर हो गये तो वहां चले गये. 

१९८६ मे आंतर धर्मीय विवाह करने के बाद मै परिवारसे अलग हो गया और थिएटरसे संबंध नही रहा. १९९९ मे पिताजी और छोटे भाईकी मृत्यू के बाद फिर थिएटरकी जिंम्मेदारी मुझपर आ गयी. लेकिन तबतक सिंगल स्क्रीन थिएटर्स मृत्यूशैया पर पहुंच चुके थे. स्टेट बॅंक की मेरी नोकरी छोडकर मैने थिएटर का बिजनेस चलानेकी कोशिश की. मगर बिजनेस डूबती नैय्या बन चुका था. सो गत वर्ष उसे हमेशा के लिये बंद कर दिया. 

ग.दि.माडगुळकर जी के बारेमें जी करता है आपको सामने बिठाउं और उनकी मराठी कविताओंका रसपान करवाउं. वे इन्स्टंट शायर थे. चुटकी बजाते ही गीत हाजिर कर देते थे. और वो भी कमाल की रचना. आज उनकी बस एकही बात कहुंगा. सी. रामचंद्र जी ने एक मराठी फिल्म बनाई थी. घरकुल. जो मॅन, वुमन ऍण्ड चाइल्ड पे आधारित थी. शेखर कपूर की मासूम भी उसीपर आधारित है. उसका संगीत भी उन्हीने दिया था. इस फिल्ममें माडगुळकरजी की एक कविता का इस्तमाल किया गया था. कविता का नाम था 'जोगिया' (ये हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत का एक राग है) तवायफ की महफिल खत्म हो जाने के बाद जो माहोल बचता है उसका वर्णन किया गया है इस कविता में. प्रारंभ के बोल है 'कोन्यात झोपली सतार, सरला रंग...पसरली पैंजणे सैल टाकुनी अंग ॥ दुमडला गालिचा तक्के झुकले खाली...तबकात राहिले देठ, लवंगा, साली ॥ (ये गीत फैय्याज जी ने गाया है. फैय्याज उपशास्त्रीय संगीत गाती है और नाट्य कलाकार है.) शब्दोंका मतलब और कविताका भाव शायद आपकी समझ मे आ रहा होगा. ये गीत या ये पूरी कविता अगर मुझे मिली तो मै आपको जरूर सुनाउंगा और हिंदीमे मतलब समझाउंगा. कमाल का गाना है. सी.रामचंद्रजी ने कमाल का संगीत दिया है.